'Raw- भारतीय गुप्तचारसंस्थेची गूढगाथा' या रवी आमले यांच्या पुस्तकाविषयी -
ही आहे रॉची कहाणी. बांगलादेश मुक्तीयुद्धाची आणि पाकिस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवायांना पुरून उरण्याची... रॉ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची. पण या केवळ हेरकथाही नाहीत. तशाही गुप्तचरांच्या कारवाया निर्वात अवकाशात घडत नसतात. त्यांना पार्श्वभूमी असते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाची. प्रत्येक राजकीय घडामोडीमागे एकाचवेळी विविध समान आणि विरोधी बले कार्यरत असतात. विभिन्न प्रतलांवरून चालत असते ते
Last refreshed: ⓘ
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more
नेपाळमार्गे आयएसआय अनेक अतिरेकी भारतात पाठवत असते. नकली नोटा मोठ्या प्रमाणात भारतात पसरवण्याचे कारस्थान सुरू असते. रॉ आणि आयबी त्यावर तोडगा म्हणून नेपाळमधील अतिरेकी पकडण्याचा सपाटा सुरु करते..
श्रीलंका चीनला नौदल तळ आणि रेडिओ स्टेशन उभारण्यास मदत करत असते त्यामुळे भारताच्या सागरी भागात सुरक्षेचे प्रश्न उद्भवणार असतात. तसेच श्रीलंकेतील तामिळी विरुद्ध सिंहीली संघर्षात, तमिळी मोठ्या संख्येने भारतात परत येत असतात. हजारो तमिळी या हिंसाचाराच्या काळात मारले जातात. भारताला त्यामुळे श्रीलंकेतील राजकारणात हस्तक्षेप करणे भाग पडते.
पाकिस्तानची भारताच्या सीमाभागात लुडबुड सुरू असते आणि सियाचिन वर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू असतो. भारताच त्याला प्रत्युत्तर असतं ऑपरेशन मेघदूत! यातच क्रूर जनरल झिया उल हक यांचा मृत्यू होतो. नेमके काय घडले ते जाणून घेण्यासाठी ऐका हे अभिवाचन.
भारतात पाकिस्तानप्रणित दहशतवाद आणि खलिस्तान मुळे अनागोंदी माजलेली असते. त्याला प्रत्युत्तर म्हणून रॉ देखील पाकिस्तानात दहशतवाद्यांना मदत पुरवते. एका वर्षात जगात झालेल्या ८०० दहशतवादी हल्ल्यापैकी ४०० एकट्या पाकिस्तानात होतात! पाकिस्तानला रॉ जशास तसे प्रत्युत्तर नेमके कसे देते
खलिस्तानी दहशतवाद्यांचा देशात धुमाकूळ सुरू असतो त्यातच काही अतिरेकी एअर इंडियाच्या विमानाच अपहरण करून ते पाकिस्तानला नेतात.. त्यातल्या प्रवाशांच काय होत? भारताच प्रत्युत्तर काय असतं?
'Raw- भारतीय गुप्तचारसंस्थेची गूढगाथा' या रवी आमले यांच्या पुस्तकाच्या या अभिवाचनात आपल्याला कळेल कि होमी भाभा यांचा मृत्यू खरंच विमान अपघातात झाला की तो कट होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर भारताच्या अणुबॉम्ब निर्मिती कार्यक्रमाचं काय झालं?